Land Subsidy: सरकार नेहमीच नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणते आणि त्या योजना राबवते. या सरकारी योजना देशातील तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.
शेत जमीन खरेदीसाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ येथे क्लिक करून पहा
दरम्यान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील लोकांना आणि भूमिहीन शेतमजूरांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.Land Subsidy
जमिनीसाठी 100 टक्के अनुदान
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2018 पासून 100% जमीन अनुदान देऊन शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये लाभार्थ्याला 4 एकर शेतजमीन किंवा 2 एकर बागेची जमीन दिली जाते.
शेत जमीन खरेदीसाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ येथे क्लिक करून पहा
या योजनांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील 202 शेतकऱ्यांना आतापर्यंत 570 एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही जमीन वाटपासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.Land Subsidy